तुषार कलबुर्गी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील वेताळ टेकडीवरच्या प्रस्तावित पौडफाटा-बालभारती रस्ता प्रकल्पाला पुणेकरांनी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध केला. या रस्त्यासाठी वेताळ टेकडी फोडली जाईल, हजारो झाडांची कत्तल केली जाईल आणि त्यामुळे तिथल्या जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, ही या विरोधामागची कारणे आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी जे आंदोलन सुरू केले आहे किंवा मोर्चा वगैरे काढला त्याला स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनीही पाठिंबा दिला. त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, अजूनही झळकत आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट- प्रस्तावित प्रकल्पामुळे गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या साधारण ३०० घरांतील किमान हजार ते बाराशे नागरिकांना त्यांच्या राहत्या घरांतून, वस्तीतून हटविले जाणार आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या रहिवाशांचे काय होणार याबद्दल ना पर्यावरणप्रेमी आंदोलक बोलत आहेत, ना याची माध्यमांमध्ये चर्चा होत आहे. पर्यावरणप्रेमींप्रमाणेच इथल्या रहिवाशांनीसुद्धा अनेकदा आंदोलने केली आहेत; पण त्यांचा प्रश्न कुणाच्याच खिजगिणतीत नाही.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune residents are strongly opposed to the paudaphata balbharti road project on vetal hill in pune amy
First published on: 25-05-2023 at 08:28 IST