राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात दशकानंतर म्हणजेच तब्बल ७० वर्षानंतर भारतीयांचे एक स्वप्न पूर्णत्वास आले. ते म्हणजे भारतातून नामशेष झालेला चित्ता भारतात परत आणण्याचे. भारतीयांसाठी हा ‘चित्ता प्रकल्प’ अतिशय महत्त्वाकांक्षी. २००९ साली तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री जयराम रमेश यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत १३ वर्षानंतर हा प्रकल्प पूर्णत्त्वास आला. अर्थातच सरकारी पातळीवरून झालेल्या प्रयत्नांची दखल तर घ्यावीच लागेल, पण त्याहीपेक्षा या प्रकल्पाची आखणी करणाऱ्या शास्त्रज्ञांची भूमिका यात महत्त्वाची आहे हे नाकारून चालणार नाही. मात्र, येथेही सरकारकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शास्त्रज्ञालाच जाणीवपूर्वक यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंता आतापासूनच जाणवू लागली आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Role of wildlife institute of india and forest officials are more important than politician about cheetahs which were brought from namibia asj
First published on: 01-04-2023 at 08:43 IST