गालिब, इकबाल, अनीस, मीर, फिराक, फैज, खुसरो हे गतकाळातले तर अली सरदार जाफरी, शहरयार हे अलीकडचे उर्दू साहित्यकार म्हणजे या भारतीय भाषेची मानचिन्हे. त्यांच्या काव्याचे, विचारांचे टीकात्मक विश्लेषण हा जणू आगीशीच खेळ. हे आव्हान गोपीचंद नारंग यांनी नुसते स्वीकारलेच नाही तर या प्रतिभावंतांच्या कल्पनासागराचा तळ गाठून त्यांच्या प्रेरणांचे वास्तव वस्तुनिष्ठपणे वाचकांसमोर मांडले. हे नारंग परवा निवर्तले. त्यांच्या शेवटच्या श्वासासोबतच उर्दू साहित्यातील लेखन-समीक्षेचा एक सोनेरी अध्यायही इतिहासजमा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपीचंद नारंग यांचा जन्म (११ फेब्रुवारी १९३१) सध्याच्या पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतांच्या दुक्की इथला. वडील धरमचंद नारंग फारसी आणि संस्कृतचे विद्वान. हिंदु कुटुंबात जन्म झाला असला तरी रोजची व्यवहार भाषा उर्दूच होती. सिंधी समाजाची पंचांगेसुद्धा उर्दू लिपीतच निघत. नारंगांची कर्मभाषाही उर्दूच ठरली. फाळणी व स्थलांतरानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून उर्दूमध्ये एमए केले. शिक्षण मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीद्वारे उर्दू साहित्यात आचार्य पदवी मिळवली. दिल्लीचा उच्चभ्रूवर्ग घडवणाऱ्या ‘सेंट स्टीफन्स’ महाविद्यालयात ते उर्दू शिकवत. अमेरिकेच्या विस्कान्सिन, मिनेसोटा, मिनेपोलिस आणि स्वीडनच्या ओस्लो विद्यापीठातही त्यांनी अध्यापन केले. १९७४ मध्ये ते जामिया मिलिया इस्लामियाच्या उर्दू विभागाचे प्रमुख झाले.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh gopichand narang urdu writers of geniuses writing ysh
First published on: 18-06-2022 at 00:02 IST