देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन महिन्यांत घडलेले दिल्लीतलेच दोन प्रसंग. दोन्ही पक्षनेतृत्वावर, पक्षाच्या धोरण व विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करणारे. त्यातला एक गुलाब नबी आझादांशी संबंधित. गेली काही महिने ‘जी २३’माध्यमातून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आझाद अखेर काही दिवसांपूर्वी एक जाहीर पत्र लिहून पक्ष सोडते झाले. दुसरा प्रसंग तर त्याआधीचा. त्याची सुरुवातच २० जूनपासून झालेली. त्याच्या केंद्रस्थानी कविता कृष्णन. सीपीएमएलच्या ‘फायरब्रँड’ नेत्या अशी त्यांची गेल्या ३० वर्षांपासूनची ओळख. त्यांनी पत्र लिहिले नाही, पण आधी ट्वीट व नंतर चित्रफितीच्या माध्यमातून पक्षाच्या ध्येय, धोरण व विचार करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. भारतीय राजकारणाचे दुर्दैव हे की आझाद यांच्या तुलनेत कृष्णन यांनी मांडलेल्या भूमिकेला ना प्रसिद्धी मिळाली ना त्यावर देशव्यापी चर्चा झडल्याचे दिसले. वास्तविक आझाद यांच्यापेक्षा कृष्णन यांनी मांडलेले मुद्दे अधिक मूलगामी व राजकीय विचारधारा अभ्यासणाऱ्या प्रत्येकाला चिंतन करण्यासाठी भाग पाडणारे आहेत. आझाद यांच्या पत्रात अन्याय झाला असा आक्रोश होता व त्यातल्या वाक्यावाक्यातून वैयक्तिक स्वार्थ डोकावत होता. तरीही आझाद यांच्या कृतीची चर्चा जास्त झाली. कदाचित काँग्रेसच्या तुलनेत डाव्यांचा आकुंचन पावत असलेला राजकीय पैस, यामुळे हे घडले असावे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will leftist will change according to surroundings should we expect this asj
First published on: 08-09-2022 at 10:10 IST