‘मीटिंग महोत्सव’ (११ जानेवारी) हा लेख वाचला. कोविड १९ च्या प्रथम लाटेवेळी भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडू नये यासाठी व विरोधकांना शमविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारतअंतर्गत २० लाख कोटी पॅकेजची घोषणा केली. पण हे पॅकेज सर्वसामान्य जनतेसाठी नसून औद्योगिक तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या उद्योगासाठी होते. सर्वसामान्य जनता पैसा हा मुख्यत: बँकेमध्ये ठेवते पण आत्मनिर्भर भारतअंतर्गत आरबीआयने सीआरआर, एसएलआर कमी केल्याने सर्वसामान्य जनतेच्या ठेवीवरील व्याजदरही कमी झाले. तसेच रोजगारही कमी झाले. त्यामुळे हे पॅकेज सर्वसामान्यांसाठी फक्त एक आभासी पॅकेज होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवन निलेवाड, लातूर

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers mail loksatta readers reaction loksatta readers comments zws 70
First published on: 12-01-2022 at 00:30 IST