उल्हास पवार (माजी आमदार  व संतसाहित्याचे अभ्यासक)
भागवत संप्रदायाने उदात्त मानवतावाद तर स्वीकारलाच, पण देवकार्याला देशकार्याचे आणि देशकार्याला देवकार्याचे रूप देण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून केला आहे. ‘तुका म्हणे नाही जातिसवे काम ज्याचे मुखी नाम तोचि धन्य’ हा संतशिरोमणी तुकाराम महाराज यांचा अभंग वारकरी प्रत्यक्ष आचरणात आणतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रामध्ये उत्सवांची परंपरा आहे. स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षकाळामध्ये, विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. १८५७च्या बंडानंतर ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हणत लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्र, भाषणे, चळवळी, आंदोलने अशा माध्यमातून लोकप्रबोधन करीत स्वातंत्र्यासाठी रान पेटवले. पेशवाईमध्ये घरात असलेल्या गणेशोत्सवाला टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले. लोकांनी एकत्रित यावे हा उद्देश गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाद्वारे साध्य केला. या उत्सवांद्वारे विविध जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेतले गेले. म्हणूनच ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ असा लोकमान्यांचा गौरव झाला. महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईचे पुणे हे केंद्रबिंदू होते. लोकमान्यांच्या काळात मेळ्यांमधून लोकसंगीत सादरीकरणातून समाजप्रबोधन केले जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलसाच्या माध्यमातून, तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक मेळ्यांच्या माध्यमातून नाटक, फटके, पोवाडे सादर करीत साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे बळ दिले. उत्सवप्रियतेसह सामाजिक भान ठेवत काळानुरूप बदल करताना प्रसंगी कठोर निर्णय घेण्याच्या अनेक घटना इतिहासामध्ये घडल्या आहेत.

मराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi in pandharpur for lord vitthal pooja in pandharpur on ashadhi ekadashi zws
First published on: 20-07-2021 at 03:43 IST