डॉ. विश्वजीत कदम : राज्यमंत्री-  सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा – महाराष्ट्र
कृषी विद्यापीठांकडे अवघ्या ०.१३ टक्के विद्यार्थ्यांचा कल आणि दुसरीकडे, कृषी-आधारित उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा! ही स्थिती तर शालेय शिक्षणात कृषी विषयाच्या समावेशाने दूर होऊ शकतेच; पण कृषी-स्वयंरोजगारांना चालना, ग्रामीण-शहरी दरीत घट असे सुपरिणामही दिसू शकतील..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विद्यापीठांनी कृषी शिक्षणाच्या सुविधा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण तरुणांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल याची मला खात्री आहे. याचा पुढला टप्पा म्हणून, शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळावे यासाठी गेल्या महिन्यात, २५ ऑगस्ट रोजी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षांताई गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री म्हणून मीही उपस्थित होतो. या बैठकीत कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रासारख्या कृषी तसेच कृषीपूरक व्यवसाय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या राज्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हे सरकार लोकहिताच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी येणाऱ्या काळात निश्चितच स्वरूपात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

मराठीतील सर्व पहिली बाजू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Introduction of agricultural education in schools akp
First published on: 14-09-2021 at 00:03 IST