‘एकंदर ३७ जण ठार’ ही कुणाला बातमीची ओळ वाटेल आणि तशी ती आहेच; पण ही सानंत तंती यांच्या एका कवितेचीही पहिली ओळ आहे! तंती यांच्या बाकीच्या कवितांप्रमाणेच ती कविताही आसामी भाषेतली. आसामचीच. रातोरात घडलेल्या हत्याकांडानंतर पडलेल्या पावसाचे, विझलेल्या आयुष्यांचे हे अल्पाक्षरी चित्रण. त्या ३७ जणांमधले १२ पुरुष होते, बाकी महिला आणि मुले. ‘मुलांच्या डोळ्यांची खोबण, बंदुकीच्या दारूनं भरली असेल’ अशा शब्दांत भीषणतेचा अनुभव देणारी ही कविता, ‘पुरुष होते भूमिहीन, महिला होत्या भुकेल्या पोरांच्या आया, आणि मुलं होती… फुलं’ याची आठवण देऊन संपते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा अनेक कवितांतून आसामच्या मातीतल्या समकालीन दु:खांना वाचा फोडणारे, विद्रोह जागा ठेवणारे कवी सानंत तंती गुरुवारी (२५ नोव्हें.) निवर्तले. ‘काय्लोइर दिन्टो आमार होबो’ (उद्याचा दिवस आमचा असेल!) या २०१७ सालचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्राप्त काव्यसंग्रहासह त्यांचे १४ काव्यसंग्रह आणि दिब्यज्योती सरमा यांनी इंग्रजीत अनुवाद केलेला ‘सिलेक्टेड पोएम्स ऑफ सानंत तंती’ हा संग्रह अशी काव्यसंपदा आता मागे उरली आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4 %e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80
First published on: 27-11-2021 at 00:06 IST