सागरात जिवाची बाजी कधी लागेल सांगता येत नाही. २०१५च्या जूनमध्ये घडलेली घटना अशीच होती. आंध्र प्रदेशातील दुर्गाम्मा बोटीवरचे सात मच्छीमार त्यांच्या बोटीचे इंजिन बिघडल्याने वाहून गेले. हवामानही खराब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ‘ते कधीच परत येणार नाहीत’ असे गृहीत धरून अन्त्यविधीसाठी मनाची तयारी केली होती, पण एक साहसी महिला कॅप्टन राधिका मेनन या केरळकन्येने बंगालच्या उपसागरात र्मचट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून काम करीत असताना त्या सर्वाना वाचवले. ते सर्व जण वाचल्याचा फोन आला तेव्हा त्यांच्या अन्त्यविधीची तयारी करणाऱ्यांना नियती म्हणून काही चीज असते हे प्रथमच प्रत्ययास आले. त्या नियतीचे नाव होते राधिका. तिला आता इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशनचा सागरी शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.  अतुलनीय सागरी साहसासाठीचा हा पुरस्कार घेणारी, जगभरातील ती पहिलीच महिला ठरेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सागरी सेवेत प्रवेश केला तेव्हाच हे माहीत होते की, संकटातील कुणालाही वाचवणे अपेक्षित असतेच. मी माझ्या जहाजाची कमांडर होते व मी माझे काम केले,’ असे ती नम्रपणे सांगते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian captain radhika menon is first woman to get bravery at sea award
First published on: 13-07-2016 at 04:03 IST