गुणनिष्ठ चातुर्वर्ण्याचे रूपांतर जातिव्यवस्थेत झाले. नंतर मनुस्मृतीने यास शास्त्राधार दिला,’ हे प्रतिपादन ऐतिहासिक दृष्टीने निर्विवाद मानता येत नाही. सर्व भारतीय फक्त या चार वर्ण-जातींत विभागले असणे कोणत्याही काळी शक्य नव्हते. सर्व लोकसमूहांना एका समाजाचे भाग मानण्यासाठी चातुर्वर्ण्याची कल्पना मांडण्यात आली असावी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकात्मतेसाठी, मग ती सामाजिक असो की सांस्कृतिक वा राष्ट्रीय असो; इतिहास हा एक महत्त्वाचा घटक असतो. सर्वाचा मिळून जसा एक इतिहास, तसाच समाजातील विविध घटकांचाही स्वतंत्र इतिहास असतो. त्यांच्या पूर्वजांनी ऐक्यभावनेने केलेले कार्य व घडविलेला देशाचा उज्ज्वल इतिहास जसा त्यांना अभिमानास्पद व प्रेरणादायी वाटत असतो, तसाच एका घटकाने दुसऱ्यावर केलेला अन्याय, अत्याचार त्यांना आठवत असतो. परस्परांनी ऐक्याने व बंधुभावाने राहावे हीच सर्वाची इच्छा असते, पण त्यासाठी कोणी कोणावर अन्याय करू नये ही अपेक्षा असते. जर अन्यायाला ऐतिहासिक वारसा असेल, तर तो इतिहास वर्तमानातील संघर्षांचा भाग होऊन बसतो. इतिहासाचा उपयोग दोन्हीही अर्थानी करता येतो. न्यायाची, समतेची, बंधुभावाची वागणूक मिळणार असेल, तर आपले पूर्वजही असेच वागत होते असा इतिहास सांगता येतो. तशी वागणूक मिळणार नसेल, तर संघर्षांचा इतिहास सांगून अन्यायग्रस्तांना संघर्षांसाठी उभे करता येते.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on caste discrimination
First published on: 08-06-2016 at 04:33 IST