बुद्ध आमचाही देवच, त्यामुळे आता आपण भांडावयाचे कारण नाही, अशी लोकांची दिशाभूल करून तसेच बाहय़ात्कारी साम्यामुळे सबगोलंकारअशी स्थिती निर्माण करून ब्राह्मणीधर्माने बुद्धधर्ममुक्त हिंदुस्थानाचे उद्दिष्ट साध्य केले.. बुद्धधर्माची क्रांती आणि त्यास हटविणारी प्रतिक्रांती यांची ही मांडणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून निवडलेली..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांस्कृतिक ऐक्याच्या धोरणात आपल्या पूर्वजांनी सामाजिक समतेचे तत्त्व जर अंतर्भूत केले असते तर भारतीय संस्कृतीला किती उज्ज्वल स्वरूप प्राप्त झाले असते. या संस्कृतीचा इतिहास वाचताना सारखे वाटत असते की, एका वर्गाने वा जातीने दुसऱ्या वर्गावर वा जातीवर केलेल्या अन्यायाचाच इतिहास आपण वाचत आहोत. वैदिक धर्मातून निर्माण झालेल्या विषमतेला आव्हान देणारे बौद्धादींसारखे धर्म उदयास आले नसते तर स्वातंत्र्य मिळण्याच्या व खंडित भारतासाठी का होईना, एक राज्यघटना तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत आपण कदाचित आलोही नसतो. डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘इतर कोणत्याही देशात जेवढी राजकीय व सामाजिक आंदोलने झाली त्याच्या अनेक पटीने ती भारतात झाली. भारताचा सारा इतिहास राजकीय व सामाजिक क्रांतीने भरलेला आहे. ..या क्रांती हिंदुधर्म व बुद्धधर्म यांच्या झगडय़ातून निर्माण झाल्या होत्या. त्यांचा निष्कर्ष असा की, ‘भारताचा इतिहास म्हणजे दुसरेतिसरे काही नसून बुद्धधर्म व ब्राह्मणीधर्म यांच्यातील वर्चस्वाचा व नैतिक संघर्षांचा इतिहास होय.’’ या संदर्भातच त्यांनी ‘क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धान्त’ मांडला आहे.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha dharma revolution
First published on: 25-05-2016 at 04:08 IST