वैदिक वाङ्मयात आर्य-अनार्याच्या शेकडो जनसमूहांची नावे आली आहेत. आर्य, अनार्य वा द्रविड अशी विरोधात्मक वा भेदात्मक विभागणी करण्याची पद्धत ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर सुरू झाली. आक्रमण करताना कोणी परकीय असले, तरी येथे कायमचे स्थायिक झाल्यावर ते भारतीय संस्कृतीचे होऊन जात; ब्रिटिशांचे राज्य स्थापन झाल्यावर परकीयांचे ‘राजकीय दास्य’ ही कल्पना हिंदूंना माहीत झाली..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीनतम संस्कृतींपैकी ग्रीक, रोम, पर्शिया, इजिप्त, मेसोपोटेमिया आदी जगातील प्रगत संस्कृती काळाच्या प्रवाहात लयाला गेल्या. परंतु, चीनचा अपवादवगळता, भारतीय संस्कृती अद्यापही आधुनिक राष्ट्ररूप धारण करून ताठ मानेने उभी आहे. विविध वंश, धर्म, पंथ, भाषा, स्वभाव असणारे जनसमूह शेकडो वर्षे भारतात येत राहिले व त्यांच्या समन्वयातून ही संस्कृती निर्माण झाली. आर्यापूर्वी द्रविड, त्यांच्यापूर्वी आदिद्रविड, त्यांच्याहीपूर्वी इतिहासाला ज्ञात नसणारे काही जनसमूह भारतात राहतच होते. आर्य व तत्पूर्वीचे अनार्य असे स्थूल रूपाने याचे वर्गीकरण केले जाते. वैदिक वाङ्मयात आर्य-अनार्याच्या शेकडो जनसमूहांची नावे आली आहेत. नंतर बाहेरून आलेल्या लोकांचा येथील पूर्वी स्थायिक झालेल्या लोकांशी विरोध व संघर्ष होणे स्वाभाविक होते. आर्य हे अनार्याना शत्रू मानत. परंतु, अशा संघर्षांत जे विजयी झाले व या देशातच कायमचे राहिले, त्या सर्वाना या देशाने आपले मानले व त्यांनीही हाच देश आपला मानला.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural unity and politics
First published on: 20-07-2016 at 03:23 IST