ज्या काळात राष्ट्र, (भौगोलिक/ सांस्कृतिक) राष्ट्रवाद या कल्पना माहीत नव्हत्या आणि पाप-पुण्याच्या कल्पना, पुण्यप्राप्तीसाठी पुण्यक्षेत्रांचे दर्शन एवढय़ापुरतेच वैचारिक विश्व मर्यादित होते; तेव्हाही नद्या/पर्वतांना पवित्र, वंदनीय मानणे आणि पुढे शंकराचार्यानी पीठे अथवा शैवपंथीयांनी बारा ज्योतिर्लिगे स्थापन करणे येथपर्यंत सांस्कृतिक ऐक्याचे उपक्रम राबविले गेले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतभूमीवरील प्रेम दृढ व चिरस्थायी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या भूमीच्या प्रत्येक भागाला व अंशाला प्रेम व पावित्र्य प्रदान करण्याची संकल्पना अमलात आणली. त्या प्रत्येक घटकांवर मातृभूमी वा पुण्यभूमी म्हणून प्रेम करायला लावण्याची ही खास भारतीय पद्धत होती. ज्यांच्या दृष्टिक्षेपात वा आकलनात या खंडप्राय व विशाल भारतवर्षांवर एकदम प्रेम करणे येऊ शकत नव्हते, त्यांच्यासाठी ही अनेक घटकांतून एकत्वावर प्रेम करण्याची पद्धत अतिशय उपकारक ठरणार होती. खरोखर एकत्वाची ही योजना इतकी यशस्वी ठरली की, भारतावर अनेक परकीय आक्रमणे व राजवटी येऊनसुद्धा प्राचीन काळातील सांस्कृतिक ऐक्य आजही बहुतांश टिकून आहे. अनेक धर्म, पंथ, जाती, जमाती, भाषा, प्रदेश यांमुळे आपल्यात कितीही विवाद व विसंवाद असला, तरी भारतीय म्हणून अंतर्यामी एकत्वाची भावना आहे व त्याचे एक मुख्य कारण ही एकत्वाची योजना होय. देशातील विविध भूमी-घटकांना पावित्र्य प्रदान करण्याची व नवीन पुण्यस्थळे निर्माण करण्याची ही एकत्वाची योजना भारतीय सांस्कृतिक ऐक्याचे तिसरे सूत्र होय.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural unity from religious ideas
First published on: 27-04-2016 at 05:12 IST