पूर्वीची टोळीव्यवस्था आजच्या जातिव्यवस्थेची मातृसंस्था ठरते. जातिव्यवस्था एकटय़ा ब्राह्मणांनी निर्माण केली असती तर इतरांनी केव्हाच नष्ट करून टाकली असती. आजही जातिअंत करणे म्हणजे बेटीबंदी तोडणे होय असे समीकरण बनले आहे व येथे या गाभ्याच्या मुद्दय़ापुरताच विचार केला आहे..गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे चातुर्वण्र्य -गुणकर्मनिष्ठ असो की जन्मनिष्ठ- संपूर्ण भारतभर कधीही अस्तित्वात नव्हते. त्यामुळे वर्गीकरणासाठी मांडलेल्या काल्पनिक व्यवस्थेपासून वास्तविक जातिव्यवस्था निर्माण होणे शक्य नव्हते. मग जातिव्यवस्था आली कोठून?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जातिव्यवस्थेची लक्षणे अनेक आहेत. बेटीबंदी, रोटीबंदी, व्यवसायबंदी, स्पृशताबंदी, श्रेष्ठकनिष्ठता ही त्यापैकी काही. यातील मूलभूत लक्षण म्हणजे बेटीबंदी. ही सारीच लक्षणे जन्माधारित आहेत व त्या सर्वाचा मूलाधार बेटीबंदी हा होय. बेटीबंदी तोडली की जातिव्यवस्थेची सारीच लक्षणे नाहीशी होतात व म्हणून ती व्यवस्था नष्ट करायची तर बेटीबंदीच तोडली पाहिजे, असे म्हटले जाते ते यासाठीच. आज बेटीबंदी वगळता उरलेली लक्षणे व्यवहारत: कोलमडून पडली आहेत व जातिअंत करणे म्हणजे बेटीबंदी तोडणे होय असे समीकरण बनले आहे व मी येथे या गाभ्याच्या मुद्दय़ापुरताच विचार करणार आहे.

मराठीतील सर्व संस्कृतिसंवाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Origin of caste system
First published on: 22-06-2016 at 04:24 IST