पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगाव्ॉटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता ही वीज आकाशात कशी तयार होते व या विजेपासून सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे, हे आपण बघू या.
पावसाळ्याच्या सुरूवातीला उन्हाळ्यात जमिनीजवळची तापलेली गरम हवा आकाशात वर वर जाते. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार-गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. अधिक घनभार (Positive Charge) हा ढगांच्या वरच्या बाजूला ओढला जातो किंवा तयार होतो व ऋणभार (Negative Charge) हा ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो किंवा खालच्या बाजूला तयार होतो. जसे जसे हे घनभारित व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहू लागतात, तसे तसे जमीन व त्यावरील झाडे व उंच इमारती यांच्यात घनभार (Positive Charge) तयार होतो. हा भारांचा फरक (Differance Between the charges) वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो. (Electrical current begins to move) विद्युत प्रवाह (Electrical current) हा वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो. (When it completes the circuit it releases the Energy in the form of light) तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रुपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.
वीज पडल्यावर काही लोक मरतात, काही जखमी होतात; काही भाजतात; काही अपंग होतात. काहींना हार्ट अ‍ॅटॅक येतो. वीज झाडांवर पडल्यास मोठमोठे वृक्ष कोलमडतात तसेच काही जळून खाक होतात. मोठय़ा इमारतीवर वीज पडल्यांस इमारत कोसळते. जमिनीवर पडल्यास जमिनीत मोठा खड्डा पडतो. आता या विजेपासून आपण आपला व आपल्या संपत्तीचा बचाव कसा केला पाहिजे? हे बघू या. काळे काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले, की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे. तुम्ही जर अशा वेळेला बाहेर असाल तसेच तेव्हा पाऊस सुरू झाला असेल व तुम्हाला जर वीज कडाडण्याचा आवाज आला; तर प्रथम स्वत:ला सुरक्षित करा. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या घरांत किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. गुरांचा उघडा गोठा किंवा एखादे शेणाचे शेड तुमचा विजेपासून बचाव करू शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही घरांत शिरलात की कुठलेही वायू असलेले इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू नका; वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. तसेच दारे व खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारांमधून; केबल मधून; तसेच पाईप मधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. पाऊस व वीज होत असताना एखादी इमारत जवळ नसेल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका. हातात छत्री असेल तर बंद करून दूर टाकून द्या, मोकळ्या मैदानांत झाडापासून दूर उभे रहा. एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर फेकून द्या किंवा दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच (अ‍ॅट्रॅक्ट) आकृष्ट होते. जुन्याकाळी विजा होत असताना लोक एखादा लोखंडाचा मोठा चमचा, पळी किंवा पावशी पळस  बागेत फेकून देत असत. ते ह्य़ांचसाठी की वीज तिकडे आकर्षित (अ‍ॅट्रॅक्ट) व्हावी व घरावर पडू नये.वीज चमकत असताना तुम्ही जर तलावात पोहत असाल किंवा समुद्रात बोटीवर असाल तर पोहणे बंद करून ताबडतोब पाण्यातून बाहेर जमिनीवर या. एखाद्या कारमध्ये (मोटारीत) शिरा. मोठी बोट असल्यास त्याच्या के बिनमधे शिरा. तिथे लोखंडापासून व इलेक्ट्रीक (विद्युत) उपकरणांपासून दूर रहा. तसेच स्वत:चा विजेपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घ्या. हवामान अंदाज काय म्हणतो ते बघा. तसेच आकाशाचे निरीक्षण करा. आकाशांत खूप काळे ढग असल्यास व दूरवरून वीज कडाडण्याचा आवाज येत असल्यास घराबाहेर पडू नका. आकाशात वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना टी.व्ही. बंद ठेवा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. एरीयल असल्यास एरियल काढून ठेवा. कारण एरियल किंवा विजेच्या तारांमधून ही कडाडणारी वीज शिरून टी. व्ही. (डॅमेज) नादुरुस्त, खराब करू शकते. कधी कधी हायवोल्टेजमुळे टी.व्ही. जळून आगपण लागू शकते; कंम्प्यूटर बंद ठेवा; फ्रिज बंद ठेवा. शक्यतो विजेच्या सर्व महागडय़ा वस्तू बंद ठेवा व त्यांचे प्लग सॉकेट मधून काढून ठेवा.
  अनंत ताम्हणे
(अभियंता व ऊर्जा अभ्यासक)

मोबाईलची काळजी
सध्या मोबाईल फोन प्रत्येकाच्या कानाला चिकटलेला असतोच. त्याची पण पावसाळ्यात विशिष्ट काळाजी घेणे आवश्यक आहे. वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) बंद ठेवा. तो चार्जिगला लावला असेल तर चार्जिग बंद करून चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. मोबाईल फोन चार्जिगला लावला असताना त्यावर बोलू नका. मोबाईल फोनमध्ये चुकूनही पाणी जाऊ देऊ नका. मोबाईलची बॅटरी ओली होणार नाही याकडे लक्ष द्या. मोबाईल एखाद्या कोरडय़ा डब्यांत ठेवा किंवा त्याला वॉटर प्रूफ कव्हर लावा. हाय वोल्टेज लाईन खालून जाताना तसेच रेल्वे इलेक्ट्रीक लाईन खालून जाताना मोबाईल फोन बंद ठेवा. कदाचित फोन चालू असल्यास व त्यावर कॉल आल्यास घेऊ नका. बाजूला जाऊन लगेच मोबाईल बंद करून ठेवा. कारण यामुळे अनेक अपघात झालेले आहेत व अनेकांचे जीव गेलेले आहेत. पावसामुळे हवेत ओलावा आलेला असतो. त्यामुळे विद्युत प्रवाह लगेच वाहून मोबाईल फोनमध्ये घुसतो. अतिउच्च दाबाचा प्रवाह मोबाईलमधे घुसल्यामुळे अपघात होतो व जीव गमवावा लागतो. मोबाईल पेटल्यामुळे लोकांना इजा झाली. कुणाचा कान फुटला, कुणी भाजले; कुणाची बोटे तुटली इत्यादी.. म्हणून मोबाईलची योग्य काळजी घ्या. मोबाईल पाडू नका; त्याच्या बॅटरीचे अतिचार्जिग करू नका. मोबाईलमधे पाणी जाऊ देऊ नका. मोबाईल चोरीला गेल्यास आयएमइआय नंबर माहिती असल्यास तो सापडू शकतो. चोराने मोबाईलमधले कार्ड जरी काढून फेकले तरी आयएमइआय नंबरमुळे आपला मोबाईल फोन कुठल्या भागात आहे हे लगेच कळते. आय.एम.इ.आय. नंबरसाठी जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये *#06# असे टाईप केले, की लगेच हा नंबर मिळतो. तो आपण आपल्याकडे कुठेतरी नोंद करून ठेवावा. अशा तऱ्हेने आपण विजेपासून सुरक्षितता ठेवली तर आपण आपले व दुसऱ्यांचे जीवन सुरक्षित ठेवू शकतो, नुकसानही टाळू शकतो.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

वीज निवारक
मोठय़ा इमारतीच्या संरक्षणासाठी इमारतीवर (Lightning Arrester) लावतात. लायटनिंग अरेस्टर म्हणजे एक टोकदार तांब्याची सळई व व तिच्या वरच्या बाजूला त्रिशूणासारका आकार केलेला असतो तो लावतात. त्याला तांब्याची पट्टी जोडून ती खाली आणून जमिनीत गाडतात म्हणजेच अर्थिग करतात. वरून दोन वेगवेगळ्या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्यूमिनियमच्या पट्टय़ा आणून खाली जमिनीत त्याचे वेगळे वेगळे आर्थिग केल्यास उत्तम. कारण विजेपासून निर्माण होणारा वीज प्रवाह (Electric current) हा मेगाअ‍ॅंपियरमधे असतो. दोन वेगळ्या पण एकाच धातूच्या पट्टय़ा दोन ठिकाणी अर्थ केलेल्या असल्यामुळे प्रवाह दूभागून वाहतो. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होते व तो जमिनीत लगेच शोषला जातो. लायटनिंग अरेस्टरचा वरील भाग टोकदार असतो कारण टोकदार भागाकडे आकाशात निर्माण होणारी वीज ओढली जाते व लगेच जमिनीत शोषली जाते. गाडली जाते. लायटनिंग अरेस्टरचे आथिर्ंग कसे करावे व अर्थिगची उपयुक्तता काय आहे, हे आपण आता बघू या. आर्थिगला इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. आर्थिग कसे करतात- जमिनीमध्ये साधारणत: ५ फुटापर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक फुटाच्या १’x१’ च्या १’’ (इंच) जाडीची तांब्याची,अ‍ॅल्युमिनीयमची किंवा  (Soft Iron) सॉफ्ट आयर्नची प्लेट पुरतात व प्लेटच्या सभोवताली कोळसा; मीठ; वाळू पुरतात. या क्रियेला ‘अर्थिग’ असे म्हणतात. अर्थिग केलेल्या ठिकाणी व त्याच्या आसपास ओलावा राहील अशी खबरदारी घेतली जाते. वरून आलेल्या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्टय़ा या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या प्लेटला जोडतात. दोन एकाच धातूच्या पट्टय़ा एकाच धातूच्या प्लेटला वेगवेगळ्या ठिकाणी जोडतात. त्यामुळे विजेचा हेवी करंट दुभागून लगेच; चटकन अर्थ पट्टीमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. त्यामुळे इमारतीचे होणारे नुकसान टाळता येते. मनुष्यहानी टाळता येते. महत्त्वाच्या मोठय़ा इमारतींना लायटनिंग अरेस्टर लावलेले असतात. फ्लॅट स्कीम तसेच बंगल्यालासुद्धा हे लावून घ्यायला पाहिजेत. वेगवेगळ्या कंपन्या इंडियन स्टँडर्ड (क.र.) प्रमाणे लायटनिंग अरेस्टर लावून देण्याचे काम करतात.