महात्मा गांधींच्या ‘चरख्याला’ टागोरांनी विरोध का केला होता? इतिहास काय सांगतो?
महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर ही भारतीय इतिहासातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वं आहेत. १९१४-१५ या कालखंडात सुरू झालेली त्यांची मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकली. पण ही मैत्री केवळ ‘हो’ ला ‘हो’ करणारी नव्हती. राजकीय विचार असोत, सामाजिक जाणिवा किंवा आर्थिक प्रश्न, अशा अनेक मुद्द्यांवर या दोन महापुरुषांमध्ये टोकाचे आणि गंभीर मतभेद होते.