‘हेरा फेरी ३’ला वादाचं ग्रहण, अक्षय कुमार-परेश रावलमधील भांडण मिटलं पण…; नवीन वाद काय?
‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या निर्मितीवरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. दक्षिणात्य निर्मात्याने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याकडे फ्रँचायझीचे हक्क नसल्याचा दावा केला आहे. Seven Arts International ने म्हटले की, नाडियाडवाला यांना फक्त एका चित्रपटाचा रिमेक करण्याचा अधिकार होता. मात्र, त्यांनी सिक्वेल तयार केला आणि हक्क अक्षय कुमारच्या Cape of Good Films ला विकले. न्यायालयाने या प्रकरणात विचारणा केली आहे.