“पैशांअभावी तुरुंगात गेलो नव्हतो, तर…”, चेक बाऊन्स प्रकरणावर राजपाल यादव म्हणाला…
राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आला होता आणि त्याला तुरुंगात जावे लागले होते. एका चित्रपटासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने ही परिस्थिती उद्भवली. शुभांकर मिश्राच्या मुलाखतीत राजपालने सांगितले की, हे प्रकरण पैशांपेक्षा तत्त्वाचा आणि वादाचा भाग होते. त्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम ठेवला असून, लोकांनी संपूर्ण कथा समजून घ्यावी, अशी विनंती केली आहे.