RBI चे धाडसी पाऊल! जागतिक आर्थिक संकटाचे सावट, तरीही गृहकर्जदारांना दिला मोठा दिलासा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. देशांतर्गत विकासदर आणि महागाईवर अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम होत असताना, आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. यामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांच्या हप्त्यांचा बोजा वाढणार नाही, ज्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळेल.