तुकाराम मुंढेंनी घेतला भेसळखोरांची झोप उडवणारा निर्णय! ग्राहकांना मिळणार सुरक्षित अन्न
महाराष्ट्र सरकारने 'ॲनालॉग' पनीरच्या निर्मिती, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांपर्यंतचा कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. असुरक्षित अन्नामुळे मृत्यू झाल्यास दोषींना जन्मठेप आणि १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात तपासणी सुरू केली आहे.