मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य, “अहिंसा आपल्या देशाचा धर्म आहे, पण कुणी वाईट..”
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की अहिंसा हा भारताचा धर्म आहे, परंतु दहशतवाद्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी प्रभू रामाने केला. या संहाराला हिंसा म्हणत नाहीत. असे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की आततायी लोकांकडून मार न खाणे आणि गुंडगिरी करणाऱ्यांना धडा शिकवणे हेदेखील आपला धर्म आहे असंही मोहन भागवत म्हणाले.