दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाचा निर्णय, श्रीनगरहून दोन विमानांचं उड्डाण; ‘या’ सेवा मोफत
जम्मू काश्मीरच्या पहलागाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर टाटा समूहाच्या एअर इंडियाने श्रीनगरहून दोन अतिरिक्त विमानं उड्डाण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ३० एप्रिलपर्यंत तिकिट रद्द केल्यास पूर्ण रिफंड आणि वेळ बदलण्याच्या सेवा मोफत दिल्या आहेत. पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.