Video: “इथून पुढे जर पाकिस्तानने…”, शस्त्रविरामानंतर भारतानं दिला इशारा!
गेल्या चार दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवरील संघर्ष थांबला असून, दोन्ही देशांनी शस्त्रविरामावर सहमती दर्शवली आहे. १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली आहे. १२ मे रोजी दोन्ही देशांचे लष्करी महासंचालक पुढील चर्चा करतील. भारताने पाकिस्तानला सज्जड इशारा दिला असून, कोणत्याही आगळीकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर शस्त्रविराम झाला आहे.