कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे नवे अध्यक्ष आलोक जोशी? JNU ते RAW!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठका झाल्या. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे पुनर्गठन केले असून, रॉचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची चेअरमन म्हणून निवड झाली आहे. मंडळात सात उच्चपदस्थ सदस्यांचा समावेश आहे.