महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना : छगन भुजबळांनी गृहमंत्री अमित शाहांना लिहिलं पत्र
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भुजबळांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्त्व सांगून, नव्या पुतळ्याची स्थापना आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे.