“विरोधकांनी संसदेत प्रामाणिक प्रयत्नांची भ्रूणहत्या केली”, मोदींचं टीकास्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर न होण्यावरून विरोधकांवर टीका केली. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षांनी महिलांच्या स्वप्नांची भ्रूणहत्या केली असल्याचा आरोप केला. मोदी म्हणाले की, या पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांचे नुकसान झाले आहे आणि त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे.