अमेरिकेच्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू; राहुल गांधी म्हणाले, “आपले पंतप्रधान…”
अमेरिकेच्या नौदलाने इराणला लक्ष्य करताना केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. या घटनेवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. गांधी म्हणाले की, मोदींनी या घटनेवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. काँग्रेसनेही सरकारवर टीका करत अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला.