‘विवाहाचं पावित्र्य जपण्या’साठी बलात्काराचा गुन्हा रद्द; HC चा मोठा निर्णय!
राजस्थान उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीने पीडित महिलेशी लग्न केल्याने त्याच्यावरील खटला रद्द केला आहे. न्यायाधीश अनुप कुमार धांड यांनी स्पष्ट केले की, विवाहाच्या पवित्रतेमुळे फौजदारी कारवाई सुरू ठेवता येणार नाही. मात्र, हा निर्णय उदाहरण म्हणून वापरता येणार नाही. तक्रारदार आणि आरोपी यांच्यात तडजोड झाल्याने हा निर्णय देण्यात आला आहे.