“सीमा हैदर पाकिस्तानला परत जाणार नाही”,केंद्राच्या निर्बंधांनंतरही वकिलांनी मांडली भूमिका!
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तिच्या वकिलांनी ती भारतीय असल्याचा दावा केला आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिक सचिन मीनाशी विवाह केला असून तिच्या मुलीचा जन्म भारतात झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या आदेशांमधून तिला वगळावे, अशी मागणी वकिलांनी केली आहे.