आखाती तणावात भारतीयांचा बळी; व्यापारी जहाजांवरील हल्ल्यात दोन जण ठार
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाच्या बाराव्या दिवशी व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन आखातात २८ भारतीय व्यापारी जहाजे अडकली आहेत. या प्रदेशात १ कोटी भारतीयांचे वास्तव्य असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.