“लग्न, मधुचंद्र आणि सहा दिवसात पतीची हत्या, मी…”; विनय नरवाल यांच्या पत्नीने काय सांगितलं?
नौदल अधिकारी विनय नरवाल यांची २३ एप्रिलला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली. १६ एप्रिलला हिमांशी आणि विनय यांचं लग्न झालं होतं. मधुचंद्रासाठी काश्मीरला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यावर हल्ला झाला. विनयच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनयच्या बहिणीने विचारलं, "माझ्या भावाची चूक काय होती?" अंत्यसंस्कारावेळी "विनय नरवाल अमर रहे" अशा घोषणा देण्यात आल्या.