जपमाळेत १०० ऐवजी १०८ मणीच का असतात? ‘त्या’ १०९ व्या ‘गुरुमणी’चे गूढ काय?
जपमाळेवर एक एक मणी मागे सारत देवाचे नामस्मरण करणारे साधक, भक्त आपले चित्त एकाग्र करून आपल्या इष्टदेवतेची आळवणी करतात. जपमाळ ही भारतीय संस्कृतीसाठी किंवा जगातील कोणत्याच भक्तासाठी अपरिचित वस्तू नाही. हातात जपमाळ घेतल्यानंतर साधक एकेका मण्यावर मंत्र किंवा नामाचे स्मरण करत पुढे जातो. सर्व मणी पूर्ण झाल्यानंतर तो एका वेगळ्या, मोठ्या मण्यापाशी पोहोचतो. त्याला ‘मेरू’, ‘सुमेरू’ किंवा ‘गुरुमणी’ म्हणतात.