१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ‘चपाती’ने घडवला होता इतिहास; काय होती चपाती चळवळ?
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध १० मे १८५७ रोजी मेरठ येथे मोठा उठाव झाला आणि काही दिवसांतच या उठावाचे लोण उत्तर आणि मध्य भारतात पसरले. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि बहादुर शाह झफर यांच्या नेतृत्वाखाली या उठावाने संघर्षाचे स्वरूप धारण केले. या चळवळीने ब्रिटीश सत्तेच्या पायाभरणीला पहिल्यांदाच मोठा धक्का दिला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा दिली. परंतु, या उठावाची किंवा संघर्षाची सुरुवात होण्यापूर्वी ब्रिटीशांना त्याची चाहूल लागली होती. यासाठी कारणीभूत होती एक चपाती.