कोण होते श्यामाप्रसाद मुखर्जी? पंतप्रधान मोदींनी बंगालचा विजय त्यांना का समर्पित केला?
भाजपाने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (४ मे) संध्याकाळी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, “आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभली असेल. ”पश्चिम बंगालमध्ये भाजपाने पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे, पंतप्रधानांनी मुखर्जींच्या आठवणींना उजाळा दिला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच १९५१ साली भाजपची मातृसंस्था असलेल्या ‘भारतीय जनसंघा’ची स्थापना केली होती.