वयवर्षे ५० नंतर शरीराची कोणती ताकद सर्वात आधी कमी होते? वय वाढलं तरी फिट कसं राहायचं?
पन्नाशीनंतर शरीरातील स्नायूंची ताकद, सहनशक्ती आणि संतुलन या शारीरिक क्षमता सर्वात आधी कमी होऊ लागतात. या बदलांना 'सार्कोपेनिया' म्हटले जाते. मात्र, सक्रिय जीवनशैली, योग्य एरोबिक्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि संतुलनाचे व्यायाम याद्वारे वाढत्या वयातही शरीर निरोगी व स्वावलंबी ठेवणे सहज शक्य आहे, असे आधुनिक फिजिओथेरेपीतील संशोधन सांगते.