दुखापत बरी झाली तरी कंबर-मान हलवायला भीती वाटतेय? समजून घ्या शरीराचं ‘ओव्हर प्रोटेक्शन’!
कंबर व मानदुखीच्या दीर्घकालीन वेदनांमध्ये 'पेन गार्डिंग' म्हणजे शरीराच्या अति-संरक्षणात्मक यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असतो. दुखापत बरी झाल्यानंतरही शरीर आणि मेंदू त्या भागाला धोकादायक समजतात, त्यामुळे हालचालींची भीती वाटते आणि स्नायू ताठ राहतात. यामुळे हालचाली कमी होतात, स्नायू कमकुवत होतात आणि वेदना कायम राहतात. फिजिओथेरेपीमध्ये ग्रेडेड एक्सपोजरद्वारे शरीराला पुन्हा हालचालींसाठी तयार करणं महत्त्वाचं असतं.