Health waterborne diseases अतिवृष्टीतील जीवाणूजन्य आजारांचे आव्हान; काय कराल? काय टाळाल?
पावसात धरती तृप्त होते, पण त्याचसोबत वातावरणात ओलसरपणा आणि दमटपणा वाढतो. हीच वाढलेली आर्द्रता सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते. विशेषतः जीवाणू आर्द्र हवामानात झपाट्याने वाढू लागतात. साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर आणि दूषित पाणीपुरवठा यामुळे या काळात संसर्गांचा प्रसार वेगाने वाढतो.