“संविधनातील हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी मारक ठरला असता” आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत
विधानसभा, लोकसभेत महिलांना ३३% आरक्षण देण्याबरोबरच लोकसभा मतदारसंघांची वाढ करण्यासाठीचे विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेले. 'इंडिया' आघाडीच्या एकजुटीमुळे एनडीए सरकारला पराभवाचा सामना करावा लागला. आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत, हे विधेयक लोकशाहीसाठी मारक ठरले असते असे म्हटले. त्यांनी २०२९ च्या निवडणुकांसाठी ५४३ जागांमध्ये आरक्षण लागू करण्याचे आव्हान दिले.