“लोकांनी हिंदी देखील शिकली पाहिजे”, नव्या शैक्षणिक धोरणाचं देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची अनिवार्यता लागू करण्यात आली आहे. 'राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४'नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी शिकावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचं समर्थन करताना हिंदीला संपर्कसूत्राची भाषा म्हणून महत्त्व दिलं आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काही संघटनांनी या धोरणावर आक्षेप घेतला आहे.