राहुरी खटल्यासाठी उज्ज्वल निकमांना सरकारकडून प्रति दिवस १ लाखाचं मानधन, काँग्रेसचा संताप
अहमदनगरमधील राहुरी येथील विधीज्ञ राजाराम आढाव व त्यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना प्रति दिवस १ लाख रुपये व प्रति तास २५ हजार रुपये मानधन मंजूर केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर आक्षेप घेतला असून, इतर वकिलांना न्याय्य मानधन न देण्याचा आरोप केला आहे.