“हिंदू कलाकारांचे चित्रपट बघा, कशाला हवेत शाहरूख-आमिर?” मंत्री नितेश राणेंचा भरसभेत सल्ला!
राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नाशिकमधील सभेत शाहरूख खान, आमिर खान यांचे चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले. त्यांनी AIMIM पक्षाला दहशतवादी संघटना म्हणत रोहिंग्या आणि बांगलादेशींची भरती असल्याचा आरोप केला. राणेंनी हिंदू कलाकारांचे चित्रपट पाहण्याचे आवाहन करत लव्ह जिहादसारख्या प्रकरणांवर टीका केली. त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.