“मुलीलाही दूध देत नाही…”, श्रेयस तळपदेने घरात पनीरसह दुग्धजन्य पदार्थ केलेत बंद
श्रेयस तळपदे मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता असून, सध्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात समाजातील भ्रष्टाचार आणि खाण्या पिण्याच्या पदार्थांच्या दर्जाबद्दल भाष्य आहे. श्रेयसने दिलेल्या मुलाखतीत त्याने आहारात केलेले बदल आणि आरोग्याच्या समस्यांबद्दल सांगितले. त्याने घरात पनीर आणि डेअरी प्रोडक्ट्स कमी केले असून, मासे आणि स्वच्छ पालेभाज्यांचा समावेश केला आहे.