अक्षय तृतीयेपर्यंत उष्णतेपासून दिलासा नाही; १५ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
राज्यात सूर्याचा कहर सुरू असून विदर्भात तापमान ४४ अंश सेल्सिअसपलीकडे गेले आहे. अकोला सलग चौथ्या दिवशी भारतातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. अमरावती, वर्धा, नागपूर येथेही उच्च तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.