लॉर्ड िमटो- (१८०७ ते १८१३) : १८०९ मध्ये रणजीतसिंहाशी लॉर्ड िमटोने करार केला. लॉर्ड िमटोच्या काळात मॉरिशसवर ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन झाले. १८१३- चार्टर अॅक्ट : या कायद्यानुसार एक लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याचे बंधन कंपनी प्रशासनावर घालण्यात आले. या कायद्याद्वारे कंपनीचा भारतातील व्यापारावरचा एकाधिकार काढून घेण्यात आला. (चहाचा व्यापार व चीनसोबतचा व्यापार वगळता). लॉर्ड हेिस्टग (१८१३ ते १८२३) : लॉर्ड िमटोनंतर लॉर्ड हेिस्टग गव्हर्नर जनरल बनला. लॉर्ड हेिस्टग अहस्तक्षेप निधीचा पुरस्कर्ता होता, पण लॉर्ड हेिस्टग्जला हस्तक्षेप निधी स्वीकारावा लागला. या काळात थॉमस मुन्रोने मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत लागू केली. (ज्या पद्धतीत शेतकरी हा भूमी स्वामी होता, तो सरकारला थेट कर द्यायचा.) तृतीय मराठा- इंग्रज युद्ध (१८१७ ते १८१८) : या युद्धामुळे पेशवा पद समाप्त झाले. १३ जून १८१८ रोजी पुण्याचा तह झाला, पेशवा बाजीराव दुसरा याला कानपूरजवळील विठूर येथे पाठविण्यात आले व उर्वरित आयुष्य कंपनीच्या पेन्शनवर जगून तेथेच त्यांचा मृत्यू झाला. (संदर्भ : आधुनिक भारताचा इतिहास- डॉ. बी. एस. ग्रोव्हर मॉडर्न इंडिया- बिपीन चंद्रा) आधुनिक भारताचा इतिहास मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना जर गव्हर्नर जनरलच्या काळातील महत्त्वाच्या घटना ठाऊक असल्या तर अभ्यास करणे व परीक्षेत प्रश्न सोडवणे सोपे जाते. लॉर्ड विलियम बेंटिंक (१८२८ ते १८३५) : लॉर्ड बेंटिंक हा सुधारणावादी होता. त्याला नेपोलियनच्या विरोधात लढायचा अनुभव होता. बेंटिंकच्या आधी कोणत्याही गव्हर्नर जनरलने सामाजिक प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले नाही. बेंटिंकने मात्र सतिप्रथा व शिशुवध बंद करून सामाजिक सुधारणा केल्या. सतिप्रतिबंधक कायदा, १८२९ राजा राममोहन रॉय यांनी सतिप्रथा बंद करण्यासाठी बेंटिंकला साथ दिली. त्याने ठगांचाही बंदोबस्त केला. वृत्तपत्रांबाबत त्याने उदार धोरण ठेवले. बेंटिंकने १८३५ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली. त्याच्याच काळात चार्टर अॅक्ट, १८३३ हा संमत झाला. शिक्षण सुधारणा - त्याने सार्वजनिक शिक्षण समिती नेमली. बेंटिंकने मेकॉलेला शिक्षण समितीचा अध्यक्ष नियुक्त केले. त्यानुसार उच्च स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजी भाषा स्वीकारण्यात आली. चार्टर अॅक्ट- १८३३ - या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला भारताच्या गव्हर्नर जनरलपदी नियुक्त करण्यात आले, त्यानुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विलियम बेंटिंक होता. या कायद्यानुसार भारतीय कायदा व्यवस्था संहिताबद्ध करण्यासाठी कायदा आयोग (छं६ उ्रे२२्रल्ल) स्थापन करण्यात आला. लॉर्ड मेकॉले : लॉर्ड विलियम बेंटिंक यांनी सार्वजनिक शिक्षण समिती नेमली आणि मेकॉलेला शिक्षण समितीचा अध्यक्ष नियुक्त केले. त्याने २ फेब्रुवारी १८३५ ला आपले महत्त्वाचे टिपण कौन्सिलरसमोर ठेवले. मेकॉलेने इंग्रजीचे समर्थन केले. मेकॉले पुरस्कृत शिक्षणपद्धतीनुसार इंग्रज सरकारने, उच्च वर्गाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे ठरविले. मेकॉलेला वंश आणि वर्णाने भारतीय, पण विचार, नीतिमत्ता आणि बुद्धिमत्तेने इंग्रज असणाऱ्यांची पिढी निर्माण करायची होती. सर चार्ल्स मेटकाफ (१८३५ ते ३६) : बेंटिंकनंतर याला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने भारतीय वृत्तपत्रांवरील बंदी उठवली. म्हणून त्याला गव्हर्नर जनरल पदावरून दूर करण्यात आले.