भारतात दूरसंचार सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी भारती एअरटेल ३.५ गिगाहट्र्झ, २६ गिगाहट्र्झ, २१०० मेगाहट्र्झ, १८०० मेगाहट्र्झ, ९०० मेगाहट्र्झ बॅण्ड्सचे हक्क मिळवत देशात ५ जी क्रांती घडवण्यास सज्ज झाली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून करण्यात आलेल्या लिलावात कंपनीने ध्वनिलहरींमधील एकूण १९ हजार ८६७.८ मेगाहट्र्झचे हक्क मिळवले आहेत. ध्वनीलहरींचा ही मोठी बँक एकूण ४३ हजार ८४ कोटींच्या मोबदल्यात विकत घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशातील सर्वात मोठी मोबाइल ब्रॉडबॅण्ड कंपनी एअरटेल देशाच्या ५ जी क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. गेल्या वर्षभरापासून कंपनी विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या असंख्य भागीदारांसह वेगेवळ्या प्रकरणांचा अभ्यास करत असून, आपल्या क्षेत्रात अग्रस्थानी राहिली आणि ५ जी तंत्रज्ञानाची प्रणेता ठरली आहे.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel rs 43084 crore strategy at 5g auction shows astuteness and promise sgy
First published on: 08-08-2022 at 14:10 IST