करोनाच्या साथीनं आपल्या सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे. शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा विचार करता आपल्याला अधिक सतर्क राहायला शिकवलं आहे. या काळात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा आपल्या आर्थिक सुरक्षेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संकटकाळात देखील आपली आर्थिक स्थिती सुरक्षित राखण्यासाठीचं महत्त्व या करोना काळानं आपल्याला पुरेपूर समजावून सांगितलं आहे. जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो, तेव्हा जीवन विमा फार मोलाची भूमिका बजावतो. यामुळे फक्त आपल्याला मानसिक शांतीच मिळत नाही, तर अगदी सुयोग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने आपल्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे जीवन विमा हा कुणाच्याही आर्थिक नियोजनामधला महत्त्वाचा भाग ठरतो. जीवन विमा अर्थात लाईफ इन्श्युरन्समुळे आपल्याला आपल्या प्रियजनांसाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भवितव्य निश्चित करण्यास मदत होते. विशेषत: गंभीर आजारासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी याचा विशेष फायदा होतो. शिवाय, राहणीमानाच्या वाढच्या खर्चाच्या ताणापासून देखील हे आपले संरक्षण करते. इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की कितीही बाजारात कितीही चढ-उतार आले, तरी एखाद्या कुटुंबाला लाईफ इन्श्युरन्समुळे त्यांचं निश्चित असं राहणीमान कायम राखता येतं. यासंदर्भात एसबीआय लाईफच्या फायनान्शिअल इम्युनिटी सर्वे २.०चे निष्कर्श विशेष महत्त्वाचे ठरतात. या सर्व्हेनुसार, ५७ टक्के भारतीयांसाठी आर्थिक प्रतिकारशक्तीचा अर्थ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्थिर असा आहे. त्यासोबतच, तब्बल ७८ टक्के भारतीयांना असं वाटतं, की एकंदरीत आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये इन्शुरन्स एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मार्च २०२०मध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर जवळपास ४६ टक्के भारतीयांनी आरोग्य विमा तर ४४ टक्के भारतीयांनी जीवन विमामध्ये गुंतवणूक केली आहे. शिवाय, ७० टक्के भारतीयांना प्रकर्षाने असं वाटतं की आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत अशा प्रकारची आर्थिक सुरक्षा वाढत जायला हवी. आर्थिक स्थैर्य हे प्रामुख्याने निरनिराळ्या स्त्रोतांमधून आर्थिक उत्पन्न मिळवणे आणि अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी आर्थिकदृष्ट्या तयार राहाणे या बाबींशी निगडित आहे. या अहवालानुसार, भारतीयांना सतावणाऱ्या सर्वात प्रमुख चिंतांमध्ये औषधोपचारांचा वाढता खर्च (५९ टक्के), नोकरीसंदर्भातील अनिश्चितता (५९ टक्के) आणि आपल्या किंवा कुटुंबियांच्या आरोग्याबाबतची चिंता (५८ टक्के) यांचा समावेश आहे. सर्वेक्षणातून अशीही माहिती समोर आली आहे की ७९ टक्के भारतीयांना आर्थिक नुकसान झालं आहे. त्यापैकी ४४ टक्के त्यातून सावरले आहेत, मात्र ३५ टक्के भारतीय अजूनही आर्थिक नुकसानीचा फटका सहन करत आहेत. प्रत्येक ४ भारतीयांपैकी तिघांनी जानेवारी २०२१पासून त्यांची सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे. तर त्यांच्यापैकी ५० टक्के भारतीयांनी सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट किंवा इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलं आहे. जसजशी अचानकपणे समोर उभ्या ठाकणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी तरतूद करण्यासंदर्भात जागृती होत आहे, तसतसं लोकांना त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या आप्तस्वकीयांना आर्थिक सुरक्षा पुरवण्यासाठी लाईफ इन्शुरन्सचं खरेदी करण्यातले फायदे समजू लागले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देखील हा परिणाम दिसून आला होता. या काळात आपला जीव गमावण्याच्या भितीमध्य वाढ झाली होती. ही भिती पहिल्यांदाच लाईफ इन्शुरन्स खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ स्पष्ट करत होती. त्यामुळे कोणतंही आर्थिक संकट किंवा अचानकपणे उभ्या राहिलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या आर्थिक प्रतिकारशक्तीचा नियमितपणे आढावा घेणं आवश्यक ठरतं. पण तुम्ही खरच कधी पूर्णपणे तयार राहू शकता? खरंतर आपल्याला असं वाटत असतं की आपण अशा प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार आहोत, पण खरी परिस्थिती कदाचित त्याहून वेगळी असू शकते. अंडरइन्शुरन्ससारखी परिस्थिती तेव्हा ओढवते, जेव्हा तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुमचा इन्शुरन्स पुरेसा नसतो. वास्तवात भारतीय कायमच अंडरइन्शुरन्स राहतात, कारण वैयक्तिक वार्षिक उत्पन्नाशी लाईफ इन्शुरन्सचं असलेलं गुणोत्तर नेहमी ३.८ पट इतकंच राहातं. हे प्रमाण वार्षिक उत्पन्नाच्या १० पट ते २५ पट या प्रमाणाच्या खूप खाली आहे. यातली चांगली बातमी ही आहे की करोना संकटकाळात अनिश्चिततेचा अनुभव आल्यामुळे बहुतांश भारतीय नागरिक त्यांच्या आरोग्य विमा आणि जीवन विम्याचं नियमितपणे नुतनीकरण करतात. एसबीआय लाईफ सर्वेच्या निष्कर्शांनुसार भारतीय नागरिक आता जास्त बचत करत असून त्यातली निम्मी रक्कम सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षितता मिळवण्यासाठी वापरत आहेत. देशात यासंदर्भात जनजागृती वाढत असल्याचं जरी दिसत असलं, तरी देखील देशात आर्थिक सुरक्षितता मिळवण्याचं ध्येय गाठण्यापासून आपण अजून बरेच दूर आहोत. आणि हे ध्येय गाठण्यात लाईफ इन्शुरन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.