भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांची वाटचाल स्वप्नवत होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर भारताने सामन्यागणिक कामगिरी उंचावत उपांत्य फेरीत धडक मारली. तर दुसरीकडे स्पर्धेपूर्वी विश्वचषकाचा दावेदार म्हणून तितकासा फेव्हरेट नसलेल्या विडिंजने मातब्बर संघांवर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची कामगिरी महत्त्वाची ठरणार का किंवा अन्य कोणता फॅक्टर सामन्याचा निकाल ठरवेल, याचे विश्लेषण करणारा हा व्हिडिओ.