भारत-पाकिस्तान ट्वेन्टी २० सामन्याआधी गायलेल्या राष्ट्रगीतासाठी आपण पैसै घेतले नसल्याचे स्पष्टीकरण महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी चार कोटी रुपये घेतल्याचा दावा सोशल मिडियावर सुरु होता. पण हे वृत्त संपूर्णपणे निराधार असून, राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असे विधान बच्चन यांनी केले. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही हे वृत्त फेटाळून लावत, अमिताभ यांची पाठराखण केली आहे. इतकेच नाही तर अमिताभ ज्या चार्टर्ड प्लेनने कोलकात्यात आले त्याचे भाडे तसेच, हॉटेल व्यवस्थेचा खर्च त्यांनी स्वतः केल्याचे सौरभने सांगितले.