ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत वि. बांगलादेश सामन्याच्या थराराची सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा अद्यापही कायम आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणाऱया या सामन्यात भारताने बांगलादेशवर अवघ्या एका धावेने मात केली. (FULL COVARAGE || FIXTURES  )
सामन्यात हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या षटकाची तर चर्चा आहेच, पण शेवटच्या चेंडूवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केलेल्या अप्रतिम रनआऊटमुळे भारताला विजय साजरा करता आला. संपूर्ण देशभरात धोनीच्या चपळतेचे आणि कर्णधारी नेतृत्त्वाचे कौतुक सुरू आहे. धोनीने अखेरच्या चेंडूवर बांगलादेशच्या मुस्ताफिजूर रेहमानला बाद केला तो क्षण..