बिहार (Bihar) हे उत्तर भारतातील महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याशी सीमा नेपाळशी संलग्न असल्यामुळे येथून नेपाळमध्ये जाण्याचा मार्ग आहे. बिहारबिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी इतके आहे. या राज्याची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे. हिंदी भाषा (Hindi Language) या प्रदेशामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.
भोजपुरी ही राज्यातील नागरिकांची बोलीभाषा आहे. त्याव्यतिरिक्त येथे उर्दू, मैथिली, मागधी या भाषा देखील प्रचलित आहेत. या राज्यामध्ये शेती हे उदरनिर्वाहाचे स्त्रोत असले तरी येथील भौगोलिक परिस्थितीमुळे शेती करणे कठीण असते. परिणामी या क्षेत्रामध्ये गरीबीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिक स्थलांतरीत होत असतात.
उत्पन्नाचे साधन नसल्याने सुविधांचा अभाव आहे. या राज्यात साक्षरता ६३.८२ टक्के आहे. पटना हे राज्याची राजधानी आणि प्रमुख शहर आहे. नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.Read More
केंद्रात सत्ता येण्यासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यांनंतर बिहारमधून सर्वाधिक खासदार निवडून येणे गरजेचे ठरते. उत्तर भारतातील राजकारणामध्ये…
बिहारमध्ये अनेक दिवस जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातील जागावाटपाची चर्चा ही प्रामुख्याने पूर्णिया जागेवर अडकली…